*मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः २८*

*मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः
२८*
तोल गेला की आंदोलन वा उठाव असंबंध व्हायला लागतात. अशा आंदोलन वा उठाकचा शेवट एक तर त्राण्यात होतो. नाही तर त्यांच्यात कमालीचा ताठरपणा आल्याने ही आंदोलन दीर्घकाळ रखडतात व रेंगाळत रहातात.
आपल्याला इतिहासात दिसते की म. फुले, नारायण मेघाजी लोखंडे डॉ आबेडकर, साने गुरुजी, दादासाहेब गायकवाड व कम्युनिस्टांनी / समाजवाद्यांनी केलेल्या चकवडी तसेच गेल्या पन्नास वर्षातील मराठवाडा विद्यापीठ नामांतर व मंडल आयोगाची अंमल बजावणी यासाठी केलेल्या आंदोलनांना आलेले चळवळीचे स्वरूप पाहाता ती आंदोलने विवेकी होती. की ती सर्व आंदोलने सामाजिक संघटनांनी चालवलेली होती. त्यात त्तामाजिक न्यायाचे तत्व होते. त्यांना चळवळी कधी सुरु
कराव्यात व कुठे थांबावाव्यात याचे भान होते. यातील सर्व नेते सुक्ष होते.
शरद जोशीची शेतकरी आंदोलने व किसान सभेची शेतकरी मोर्चे, सुंदरलाल
बाहुगुणाचे चिपको आंदोलन, मेधा पाटकरांचे नर्मदा बचाव आंदोलन, ही सर्व आआंदोलने शिस्तबध्द होती. कारण ही आंदोलने चळवळीतून जन्मलेली होती मात्र दीर्घकाळ चाललेला व अजूनही न मिटलेला मुंबई कापड मिल कामगार संप हा कुठे थांबावावा याचे भान न बाळगल्याने मुंबईच्या मिल कामगारांचे अतोनात नुकसान करून गेला आहे. कारण या संपाचा आम चळवळीच्या माध्यमातून
झालेला नव्हता. तो त्यांच्या नेत्यांच्या व्यक्तीगत अभिनिवेषातुन झाला होता. तेथे
सामाजिक भान नव्हते वैयक्तिक अहंकार होता आदिवासीच्या जंगल जमिनखेडुतांच्या चळवळीला व त्या अनुषंगाने उत्पन्न झालेल्या आदिवासींच्या प्रश्नालाही सत्तर वर्षांचा इतिहास आहे. कारण ती आंदोलने चक्रवळीच्या स्वरुपात लढवली गेली आहेत. यात शासनाने आंदोलकांची बाजू व आंदोलकांनी शासनाची बाजू ऐकण्याचा समंजसपणा दाखवला होता. म्हणून ही आंदोलनेही ठिशिष्ट दिशेने हळू-हळू पुढे सरकत जाऊन त्यांच्या गंतव्य स्थानापर्यंत पुढे गेलेली आहे.
सुंदरलाल बहुगुणा आणि मेधा पाटकर यांनी केलेली आंदोलने, उभारलेले लडे. त्यात उतरलेला जनसहभाग यामुळे ही आंदोलने विवेकी, संयमी व समाज परिवर्तनकारी बनली होती. त्यांना विशिष्ट दिशा, समतेची आशा व उत्थानाची मनिषा होती, सामाजिक व वैचारिक स्वातंत्र्याचे टोक होते. या चळवळींनी समाज दोन पाऊले पुढे गेला आहे. व त्यांनी समाज विकासाचे शाश्वत सुत्र निर्माण केले आहे.
आजच्या ओबीसींमध्येच आरक्षण द्या या अतिरेकी, स्वार्थपरायण व विवेकहीन आंदोलनांमध्ये समतेची चळवळ, बंधुत्वाचे विचार, सामाजिक न्यायाची
मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण
६०
तत्वे कुठेच दिसत नाहीत असे बोचरे टोक व विचारांची अतिरेकी धार असलेली आंदोलने शासनावर काही काळ दवाव जरूर आणू शकतात, मात्र सरकारला त्यांना अभिप्रेत असलेला निर्णय घ्यायला मात्र बाध्य करू शकत नाही. कारण सरकार हे माय-बाप सरकार असते त्यांना समाजातील सर्वच घटकांचा विचार करावा लागतो, विकास करावा लागतो व तसा विवेक बाळगावा लागतो.
या आंदोलनाच्या परिणामी व आरक्षण गमावण्याच्या भितीपोटी ओबीसी
समाजामध्ये अभुतपुर्व जागृती निर्माण झाली असली तरी ती फसवी आहे. ती चुकीचे शत्रु व तात्कालिक उद्देश डोळ्यासमोर ठेवून केली जात आहे. त्यातून ओबीसीमध्ये त्यांचा शत्रू-मित्र कोण आहे हे ओळखण्याची क्षमता येईल असे दिसत नाही. वर्षानुवर्षे ज्यांनी यांचे सामाजिक, बौद्धिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय शोषण केले त्यांच्याच वळचणीला हा समाज अजूनही पडलेला आहे. फुले-शाहू-आंबेडकरांचे विचारांच्या माध्यमातून जातीसंस्था झुगारण्यासाठी अजूनही हा समाज तयार होत नाही गमावलेली कारागिरी व जातीगत व्यवसायातून स्वतंत्र उद्योजक बनण्याची मानसिकता अजूनही हा समाज बाळगत नाही.
तामिळनाडूमधले ३०% अर्थकारण तेथल्या ओबीसी समाजाच्या माध्यमातून उभे राहिले आहे तेथल्या दलित व ओबीसी जाती उद्योजक बनण्याच्या पथावर आहे. राज्याच्या निर्णय प्रक्रियेत त्याचा ३०% वाटा आहे. आणि महाराष्ट्रात ओबीसींचे धन मंदिरात जमा होते व उरलेले धन फसव्या सामाजिक स्टेटसवर उधळले जात आहे.
आयुष्यभर सायकलीवर तंगड्या तोडत वा बाईकवर कामाला व रोजीरोटीवर जाणारा इथला ओबीसी कर्मचारी, शिक्षक, नोकरदार कारकून सेवानिवृत्त होताच चार चाकी गाडी घेतो. व फक्त दारापुढे उभी करतो. शोभेसाठी!
फसव्या व चुकीच्या सामाजिक स्टेटससाठी कष्टाचा पैसा भांडवलदार, दलाल व व्यापाऱ्या तिजोरीत जमा करतो. आपली स्वतःची आर्थिक व वैचारिक बोटबैंक
तयार करण्याऐवजी, सामाजिक जागृती व टिकाऊ सामाजिक प्रबोधनात तो पैसा वापरण्याऐवजी शोषकांची आर्थिक प्रगती साधण्यात खर्च करतो. आंबेडकरी चळवळीतून बीएसपी, बामसेफ, पे बैंक टू सोसायटी अशी आंदोलने व चळवळी ओबीसींमध्ये उभ्या राहिल्या नाहीत. निदान मा. प्रकाश आंबेडकरांच्या वंचितसारखा एखादा दबाव गटही ओबीसींनी तयार केला नाही.
मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण क्रमशः
२८
***शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

